स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली तरी त्याला खरेदी करणारं जगात कुणीच भेटत नाही...
#जिंदगीडॉटकॉम
मनाच्या मोकळ्या कप्प्यात आयुष्यातल्या आठवणी रचुन ठेवायच्या असतात...
व्यथांची कथा समजुन घेण्यासाठी त्यांच्याशी एकरुप व्हावं लागतं...
पडणाऱ्या प्रत्येक थेंबात त्याचं स्वतःचं तळं सामावलेलं असतं...
आपलं शब्द समजुन घेण्यासाठी प्रत्येकालाच एका चांगल्या श्रोत्याची गरज असते...
माणसाचं दिसणं बदललं म्हणुन त्याचं असणं बदलण्याची गरज नाही...
जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना माणुस स्वतःचं जगणं विसरुन जातो...
समाधान शोधावं लागत नाही, ते माणसाच्या चित्तातच सामावलेलं असतं...
पायांनी फक्त अंतरं कापता येतात, परंतु प्रवास पार पाडायला इच्छाशक्तीचीच गरज असते...
अंकुर जळण्याची भीती बाळगुन बी कधी रुजणं थांबवत नाही...
आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम