जिंदगीचा मनसोक्त स्वाद घेतला की मरणाचीही चव बदलते...
#जिंदगीडॉटकॉम
वास्तव हे माणसाच्या जगण्याला चिकटलेलं असतं...
संधीची गाठ पडेपर्यंत संकटांसोबतच चालायचं असतं...
अस्तित्व निरर्थक असलं तरी कुणाच्यातरी जगण्याला त्यांनं अर्थ प्राप्त होत असतो...
पावसाला अनुभवणं मातीकडुन शिकावं लागतं...
आयुष्य माणसाची परीक्षा घेत असते, त्याची उत्तरं माणसालाच शोधावी लागतात...
मागे वळुन पाहिल्याशिवाय वाटचालीचा हिशेब लागत नाही...
भावनांच्या वादळात मन आठवणींच्या मागं धावत राहतं...
एकटेपणाला आठवणीत रमायला आवडतं...
परिस्थितीच्या साच्यात तडजोडीचा आनंद आपसुक वाट्याला येतो...
स्वभाव बदलत गेलो की प्रभाव बदलत जातो...
काचणारे धागे कधी ऊब देत नसतात...
आयुष्य म्हणजे जगण्यासाठी मिळालेल्या मोजक्याच क्षणांचा बाजार आहे...
अगतिकतेच्या वाटेवरचा प्रवास पुर्ण करण्यासाठी प्रयत्नांची गती वाढवावी लागते...
आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम