माणसाच्या गरजा त्याला जगण्याचे सगळे नियम स्वीकारायला भाग पाडतात...
#जिंदगीडॉटकॉम
प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात...
वृत्तीच समाधानी असेल तर प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद सापडतो...
वाट तीच असली तरी प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा असतो...
आयुष्यातील काही अनोळखी क्षणांचे साक्षीदार फक्त आपणच असतो...
संस्कार ही माणसाला आयुष्यभर पुरेल अशी मिळकत असते...
मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं हेच माणसाच्या आयुष्यातलं खरं आव्हान असतं...
संकटांकडे डोळेझाक केली म्हणुन ती नजरेआड होत नसतात...
आव्हानाला सुद्धा आव्हान पेलु शकणाऱ्यांचीच प्रतीक्षा असते...
आपण स्वतःकडे लक्ष देतो तेव्हाच लोकं आपल्याकडे लक्ष देतात...
माणुस बदलतो म्हणुन माणुसकी बदलते...
लोकांचे स्वभाव बदलायला निघालेल्यांना स्वतःच्या उंचीचा गर्व करुन चालत नाही...
प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ माणसाला जगायला शिकवतो...
उतारावरुन वाहणाऱ्या पाण्यालाच आपला तोल सावरावा लागतो...
रस्ते बदलले तरच मुक्काम बदलत असतात...
आनंद मिळवणे हेच प्रत्येकाच्या आयुष्याचे अंतिम ध्येय आहे...
वळुन बघितलं की बरंच काही कळुन येतं...
थेंब कितीही छोटा असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक असते...
मनातील कल्पनांची गणितं माणसाच्या कर्तृत्वाला सोडवावी लागतात...
निरोपाच्या क्षणीच आठवणी मनात गर्दी करतात...
नीतीमत्तेच्या व्याख्या समाजाच्या दृष्टीवर अवलंबुन असतात...
दुसऱ्यांच्या नजरेतुन स्वतःकडे पाहणाऱ्यांनाच आपल्या सौंदर्याची काळजी असते...
आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम